Maharashtra Weather Alert | महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल झालेला आहे. मध्यंतरी झालेल्या पावसामुळे आधीच जनजीवन विस्कळीत झालं होतं परंतु पुन्हा एकदा हवामानात बदल होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालेले आहे. हवामान विभागाने दिलेल्या ताजा अंदाजानुसार, पावसाचा जोरदार आगमन होणार आहे. 19 सप्टेंबरला राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी पडतील अशी शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांनी सावध राहणं गरजेचं ठरणार आहे. Maharashtra Weather Alert
पालघर, ठाणे, मुंबईसारख्या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये थोडासा जोरदार पाऊस पडू शकतो. कोकणातील पावसाचा जोर आधी पेक्षा कमी झालेला आहे पण पावसाच्या सरी पुन्हा दिसतील.
पुणे, सातारा, चांगली, कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. गाठमात्यांवरती मात्र पावसाचा जोर जास्त राहील. सोलापूर जिल्ह्यात हवामान विभागाने येलो अलर्ट दिला आहे. कारण इथे वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट अपेक्षित आहे.
मराठवाड्याबाबत बोलायचं झाल्यास, मराठवाड्यात देखील पावसाचा आगमन होणार आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर, धाराशिव या जिल्ह्यात वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि पावसांच्या जोरदार सरी येणार आहेत. इथेही येलो अलर्ट जरी करण्यात आलाय, हिंगोली आणि नांदेड मध्य मात्र हलक्या सरींची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यात पाऊस हलक्या ते मध्यम राहील. नाशिक आणि नाशिक घाटमात्यांवरती मात्र विजांचा कडकडाटात आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
विदर्भ मध्ये अमरावती, नागपूर, भंडारा, वर्धा या जिल्ह्यात विजांचा आणि जोरदार पावसाची शक्यता वर्तमात आलेली आहे. या ठिकाणी देखील हवामान विभागाने अलर्ट दिलेला आहे. मात्र अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ येथे कोरडे वातावरण राहील.
एकूण चित्र असं की राज्यात कुठेही सरी पडतील, कुठेही वादळी वारे वाहतील, कुठे कोरडे वातावरण राहील, असं वेगवेगळ्या चित्र पाहायला मिळणार आहे. कोकण, घाटमाथा, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा झोका असल्याने हवामान विभागाने सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे.
म्हणजे १९ सप्टेंबर चा दिवस महाराष्ट्रासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे या दिवशी पावसाचा जोरदार कमबॅकमुळे अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी खबरदारी घ्यावी असा संदेश हवामान विभागाने दिलेला आहे.
हे पण वाचा | महाराष्ट्रातील या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती पहा!
